‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
निश्चित निर्णय घेण्याचे धाडस अंगी येण्यासाठी मनाचा विकास योग्य दिशेने केला पाहिजे.
प्रत्येकाच्या मनात आशेचा अंकुर असतोच, त्याला खतपाणी घालून वाढवले पाहिजे. निर्णय घेण्याचा गुणधर्म बाहेरून कोठून येत नाही, माणसाच्या मनातच तो तयार होतो. हा जर मनाचाच खेळ असेल, तर ठाम निर्णय घेण्याच्या बाजूलाही तो वळवता येईल. माणसाच्या मनाची कितीही धरसोड वृत्ती असली, तरी विचार करून ती बदलता येते आणि निर्णय घेण्याची शक्ती मनात निर्माण करता येते.
बऱ्याच जणांची वृत्ती अशीच नकारात्मक असते. त्यांचे सर्व आयुष्य अपयशाकडे प्रवास करीत असते.
अशावेळी आपण स्वतःचे परीक्षण करावे, आपल्या मनाची ताकद किती आहे हे तपासावे. ज्यांना यश आले आहे त्यांची मनस्थिती कशी होती याची पाहणी करावी. अयशस्वी झालेल्यांचीही माहिती घ्यावी. शंका घेण्याचा, संकटाचीच अपेक्षा करण्याचा आपला नकारात्मक दृष्टिकोन बदलण्यास सुरुवात करावी. सामान्यपणे बरेच जण कुठलाही अंतिम निर्णय घ्यायला घाबरतात, आपण ठरवले आहे त्याचा ते पुन्हा पुन्हा विचार करीत राहतात आणि एका क्षणी नकारात्मक होऊन पहिला निर्णय बदलून टाकतात. या गोष्टी बदलवून आपल्या निर्णयाला चिटकून राहायचे कसाब आत्मसात करावे. अर्थात निर्णय घेताना चुका झाल्या तरी त्याचे परिणाम सहन करण्याची तयारी ठेवावी. एकदा घेतलेल्या निर्णयात बदल करायला ठाम नकार द्या.
मनाची चलबिचार, धरसोड व संशय यांचेच दुसरे नाव अपयश आहे ले लक्षत घ्या.
निर्णयक्षम व्हा…
व्यवसाय साक्षर व्हा…
(निर्णयशक्ती या पुस्तकातील सारांश…)
_
उद्योजक मित्र
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
Nice