लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
व्यवसाय निवडताना पूर्ण विचार करून निवडा. व्यवसाय निवडल्यांनंतर तो योग्य आहे कि अयोग्य याची चर्चा कुणाशीही करू नका. लोकांना नेहमीच तुमच्या मताच्या विरूद्ध मत व्यक्त करण्यात स्वारस्य असतं. त्यात समोरचा जर नोकरीच्या मानसिकतेचा असेल तर तो व्यवसायाबद्दल कधीच चांगलं मत व्यक्त करणार नाही. लोकांना जे काही विचारायचं आहे ते व्यवसाय निवडण्याच्या आधीच विचारा..
एकदा व्यवसाय निवडल्यानंतर लगेच त्याच्या स्थापनेच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात करा. तो व्यवसाय चांगला आहे कि वाईट हे लोकांना विचारत बसाल तर गोंधळून जाल. कुणी तुम्हाला त्यापेक्षा दुसरा एखादा व्यवसाय कसा चांगला आहे हे सांगेल, कुणी त्या व्यवसायात त्याच्या मित्राच्या नात्यातल्या एकाच्या मित्राचा नातेवाईक कसा अपयशी झाला हे सांगेल, कुणी तो व्यवसाय चालणारच नाही असं म्हणून मोकळं होईल, कुणी आणखी चार पाच व्यवसायांची यादी समोर ठेवील… अशा प्रकारे प्रत्येक जण तुम्हाला कन्फ्युज करण्याचाच प्रयत्नच करेल. आणि शेवटी तुम्ही इतके गोंधळून जाल कि व्यवसाय करू कि नको आणि करू तर कोणता करू या विचारतच तुमची काही महिने-वर्षे निघून जातील. त्यामुळे जी काही चर्चा करायची असेल ती व्यवसाय निवडण्याआधीच करा… नंतर बिलकुल नाही.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील